आचार्यांची शृंखला

साया थेट्ग्यि

1873-1945

सयाजी यू बा खिन च्या आचार्यांचा खालील वृतांत आंशिक रूपामध्ये म्यानमारचे धम्मकरिया उ ह्टे ह्लैन्ग चे पुस्तक "साया थेट्ग्यि" यावरील अनुवादावर आधारित आहे.

साया थेजी ("सा या टा जी" बर्मी भाषेमध्ये) यांचा जन्म आठ मैल अंतरावरील रंगून च्या दक्षिणेस रंगून नदीच्या विरुद्ध बाजूस असलेल्या शेती गांव प्याव्ब्वेग्यि मध्ये 27 जून 1873 रोजी झाला होता. त्यांचे नांव मौन्ग पो असे ठेवण्यात आले. त्यांचे वडील चार मुले म्हणजेच ते स्वतः,दोन भाऊ आणि एक बहिण यांची काळजी घेण्यासाठी आईला सोडून मृत्यू पावले तेव्हा पो थेट 10 वर्षांचे होते.

ती गांवामध्ये भाजीपाला आणि भाज्या विक्री करुन कुटुंबाचा चरितार्थ चालवित होती. लहान मुलगा राहिलेला माल विकण्यास सर्वत्र जात असे, पण पुष्कळदा काहीही न विकता घरी येत असे, कारण की आवाज देऊन मालाची विक्री करण्यात त्याला लाज वाटत होती.ह्या कारणामुळे त्याच्या आईने दोन मुलांना पाठविणे चालू केलेः पो थेट यांना त्यांच्या डोक्यावर छोट्या प्लेट मध्ये माल घेऊन आणि त्याच्या धाकट्या बहिणीला त्यांच्या मालाचा पुकारा करण्यासाठी.

त्यांच्या कुटुंबाला गरजा पूर्ण करण्यासाठी साहाय्याची आवश्यकता होती,त्यामुळे त्यांचे औपचारिक शिक्षण केवळ न्यूनतम-फक्त सहा वर्षेच झाले. त्यांच्या माता-पित्याकडे कोणतीही जमीन किंवा भात शेती नव्हती, आणि त्यामुळे भात कापणी नंतर दुसऱ्यांच्या शेतातील पडलेली भाताची कणसे एकत्र करुन त्यावर ते गुजराण करीत असत. शेतापासून घरच्या रस्त्यावर एका दिवशी,पो थेट यांना सुकत चाललेल्या तलावात काही लहान मासे दिसले.त्यानी ते पकडले आणि अशा उद्देशाने घरी घेऊन आले, कि त्यांना गांवातील लहान तलावात सोडू शकू. त्यांच्या आईने ते मासे पाहिले आणि ती त्यांना पकडल्याबद्दल आपल्या मुलाला दंड करणारच होती, परंतु जेव्हा त्यांनी आपल्या हेतूबद्दल सांगितले तेव्हा दंड देण्याऐवजी तिने म्हटले, "Sādhu, sādhu! (चांगले केले, चांगले केले).” ती एक दयाळू माहिला होती जी कधीही दुखवत नव्हती किंवा खरडपट्टी काढत नव्हती, परंतु कोणतेही akusala (अनैतिक) कृत्य सहन करत नव्हती.

जेव्हा ते 14 वर्षाचे होते, मौन्ग पो थेट यांनी आपल्या आईला दैनिक मजूरी देण्यासाठी एका बैलगाड़ीवर चालक होऊन तांदळाच्या वाहातूकीचे काम चालू केले. ह्यावेळी तो इतका लहान होता की बैलगाडीमध्ये चढण्या-उतरण्यासाठी त्याला एक खोके बरोबर घ्यावे लागे.

पो थेट यांची पुढील नोकरी होती ती एका नावाड्याची. प्याव्ब्वेग्यिच्या गावातील शेती सपाट होती, ज्याला रंगून नद्याना मिळत होत्या अशा पुष्कळशा उपनद्यां पासून पुरवठा होत होता. जेव्हा शेतातील भातशेतीमध्ये पूर येत असे त्या वेळेस नावेतून यात्रा करणे एक समस्या असे,आणि यात्रा करण्याचे सर्वसाधारण साधन म्हणजे लांब सपाट तळवाल्या नावेद्वारेच होत असे.

एका स्थानिक राइस मिल मालकाने तांदूळाचा भार घेऊन जाणाऱ्या आणि मन लावून काम करणाऱ्या त्या लहान मुलास पाहिले, आणि त्याला प्रति महिना सहा रुपयाच्या मजूरीवर चक्कीच्या तांदुळाचा हिशोब ठेवण्यासाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. पो थेट स्वतः चक्कीतच राहात होते आणि तांदूळ वाटाण्याची डाळ असे साधे जेवण खात होते.

सर्वात आधी त्यांनी भारतीय चौकीदार आणि अन्य मजूरांकडून तांदूळ खरेदी केले.त्यांनी त्यांना सांगितले की ते स्वत: मिल मधून पिसलेल्या तांदुळाचा कचरा जो डुक्कर आणि कोंबडीच्या खाण्यासठी ठेवला होता त्यास साफ करण्यास मदत करू शकेल. परंतू मिल मालकाच्या माहिती शिवाय हे तांदुळ घेऊ शकत नाही असे सांगून पो थेट यांनी नकार दिला. मिल मालकाला ह्या गोष्टी समजल्या वर मालकाने त्यास परवानगी दिली.ह्यामुळे घडले असे की, मौन्ग पो थेट यांना पुष्कळ वेळेपर्यंत तांदुळातील मोडके-तोडके तुकडे खा्वे लागले नाहीत. लवकरच एक सपाट बुडाची होडीमालक आणि गाडी मालक यांनी त्याला तांदूळ देणे चालू केले कारण तो एक उपयुक्त आणि तत्पर कर्मचारी होता. तरीही,ज्यांच्याजवळ तांदुळ खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते अशा गरीब गांवकऱ्याना वाटता यावे म्हणून पो थेट यानी कचरा एकत्र करणे चालूच ठेवले.

एका वर्षानंतर त्याच्या पगारामध्ये 10 रुपयां पर्यंत वृद्धि झाली, आणि दोन वर्षानंतर 15 रुपये.गिरणी मालकाने त्याला चांगल्या दर्जाचे तांदूळ खरेदी करण्यासाठी पैसे देण्याची तयारी दर्शविली, आणि त्याला 100 टोपल्या दरमहा मोफत दळण्याची परवानगी दिली. त्याच्या मालकाने मासिक वेतन पंचवीस रुपयापर्यंत वाढविले, जे त्याला आणि त्याच्या आईच्या पालन-पोषणासाठी पुरेसे होते.

मौन्ग पो थेट जेव्हा सुमारे 16 वर्षाचे झाले तेव्हा त्यांनी प्रथेनुसार मा ह्म्यिन बरोबर लग्न केले. त्यांची पत्नी एका समृद्ध जमीनदार आणि तांदुळाच्या व्यापाऱ्याच्या तीन मुलींमधली सर्वात लहान होती. दंपत्तिला दोन मुले होती,एक मुलगी आणि एक मुलगा.बर्मी रुढीनुसार ते मा ह्म्यिनच्या माता-पिता आणि बहिणी बरोबर एकसाथ एका संयुक्तपरिवारामध्ये राहात होते.मा यिन, लहान बहिण, एकटी राहून एका सफल लघु व्यवसायामध्ये यशस्वी झाली. नंतर ती अभ्यास आणि ध्यान शिकविण्यामध्ये यू पो थेट याना मदत करण्यास कारणीभूत ठरली.

लहानपणी यु थेट एक नवशिके भिक्षु म्हणून नियुक्त होण्याची संधी मिळाली नाही, जी बर्मामध्ये एक महत्वपूर्ण आणि साधारण गोष्ट होती. परंतु जेव्हा त्यांचा पुतणा मौन्ग न्युन्ट 12 व्या वर्षी एक नवशिके भिक्खू झाला त्यावेळेस यु थेट स्वतः एक नवशिके भिक्खू झाले.नंतर काही काळासाठी, ते स्वतः एक bhikkhu (भिक्षु) म्हणून नियुक्त झाले.

जेव्हा ते सुमारे २३ वर्षाचे होते,तेव्हा त्यांनी धर्माची दीक्षा घेतलेल्या आचार्य साया न्युन्ट यांच्याकडून आनापान(Anapana)शिकले आणि सात वर्ष ध्यानाचा अभ्यास चालू ठेवला.

यू थेट आणि त्यांच्या पत्नीचे काही मित्र आणि नातेवाईक आजूबाजूच्या गांवामध्ये राहात होते. काही काका,काकू,पुतणे,पुतण्या,चुलत भाऊ आणि सासू-सासऱ्या बरोबर,त्यांनी परिवार आणि मित्रांच्या समवेत सद्भाव आणि संतोषाने सुखद जीवन घालविले.

ह्या खेडेगांवातील शांति आणि सुख भग्न झाले जेव्हा 1903 मध्ये साथीच्या कॉलराने पुष्कळशा गांवावर आघात केला. पुष्कळसे गांवकरी मृत्यु पावले, काही दिवसाच्या आतच.असे सांगितले जाते की यू थेटचा मुलगा आणि युवा किशोरवयीन मुलीचा मृत्यु त्यांच्या हातातच झाला. त्यांचा दीर, को काए, आणि त्यांची पत्नीसुद्धा रोगाची शिकार झाली, त्याच बरोबर यू थेट यांची पुतणी जी त्यांच्या मुलीची लहानपणापासूनची मैत्रिण होती.

ह्या आपत्तीने यू थेटना खोलवर प्रभावित केले, मानसिक शांतीसाठी त्यांना कुठेही आश्रय मिळाला नाही.जीवावर उदार होऊन ह्या दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग शोधण्यासाठी, त्यांनी आपली पत्नी आणि भावजय, मा यिन, आणि अन्य नातेवाइकांची "अमरत्व" च्या शोधासाठी गांव सोडण्याची अनुमती मागितली.

यु थेट हे आपला एक समर्पित साथी आणि अनुयायी, यू न्योला आपल्या बरोबर घेऊन एका उत्कट शोधासाठी पहाडी विश्रांती आणि वन विहारांचा दौरा करीत,विभिन्न शिक्षक भिक्षु अथवा साधारण जसेही असतील, त्यांच्याबरोबर अध्ययनासाठी पूर्ण बर्माभर फिरले. शेवटी ते त्यांचे पहिले आचार्य साया न्युन्टच्या सल्ल्यानुसार उत्तर मोन्य्वा येथे आदरणीय लेडी सयाडॉच्याबरोबर अभ्यास करण्यासाठी आले.

आध्यात्मिक शोधाच्या ह्या वर्षादरम्यान, यू थेट यांची पत्नी आणि भावजय प्याव्ब्वेग्यि मध्ये राहिले आणि आपल्या भाताच्या शेतीत कार्यरत राहिले. सर्व काही ठीक चालले आहे असे पहाण्यासाठी पहिली काही वर्ष ते येत राहिले.परिवाराची सफलता पहाताच त्यांनी निरंतरतेने अधिक ध्यान करणे चालू केले. ते लेडी सयाडॉ बरोबर सात वर्ष राहिले,त्यावेळी त्यांची पत्नी अणि भावजय यांनी प्रत्येक वर्षी त्यांना परिवाराच्या शेतांतील पिकाच्या उत्पन्नांतील पैसे पाठवून प्रोत्साहित केले.

यू न्यो बरोबर ते शेवटी आपल्या गावी परत गेले, परंतू आपल्या पूर्वीच्या गृहस्थी जीवनामध्ये ते परत आले नाहीत. लेडी सयाडॉ यांनी त्यांना परत जाण्यावेळी सल्ला दिला की मेहतनीने काम करुन आपली samādhi (एकाग्रता) आणि paññā (शुद्ध ज्ञान) विकसित करा जेणेकरून अखेरीस ते ध्यान शिकवण्याचे काम सुरू करु शकतील.

त्यानुसार, जेव्हा यु थेट आणि यु न्यो प्याव्ब्वेग्यिला पोहोचले तेव्हा ते सरळ आपल्या कुटुंबाच्या शेताच्या किनारी असणाऱ्या sala (विश्रांती घर) इथे गेले आणि त्याचा उपयोग ते एक धम्म हॉल म्हणून करु लागले.येथे त्यांनी निरंतर ध्यान साधना केली. तिथे त्यांनी दिवसातून दोन वेळा जेवण बनवण्यासाठी जवळच राहत असलेल्या एका स्रिची व्यवस्था केली.

ध्यानामध्ये जलद प्रगती करत यू थेट,एक वर्षभर ह्याप्रकारे खनपटीस बसून ध्यान साधना करीत राहिले. ह्या कालावधीच्या शेवटी त्यांना आपल्या शिक्षकांचा सल्ला घ्यावासा वाटला. त्यांना व्यक्तीशः लेडी सयाडॉ यांजबरोबर बोलता येणार नव्हते, तरीही त्यांना माहीत होते की त्यांच्या शिक्षकांची पुस्तके त्यांच्या घरी एका कपाटात होती. ह्या कारणामुळे ते मॅन्युअल पाहण्याठी तेथे गेले.

दरम्यान त्यांची पत्नी आणि त्यांची बहीण, त्यांच्या दीर्घ काळ दरम्यानच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्यावर खूपच रागावले होते. त्यांच्या पत्नीने तर त्यांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा बहिणींना यू पो थेट येतांना दिसले तेव्हा त्यांनी न नमस्कार करण्याचा न स्वागत करण्याचा निर्णय घेतला. परंतू प्रत्यक्षांत ते जेव्हा दरवाजात आले, तेव्हा सर्वांनी आपोआप त्यांचे उत्स्फुर्तपणे स्वागत केले. ते काही वेळ बोलले आणि यु थेट यांनी त्यांची क्षमा मागितली, जी त्यांनी सहजगत्या मंजूर केली.

बहिणींनी त्यांना चहा आणि जेवण दिले आणि त्यांनी आपली पुस्तके घेतली. त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले की ते आता आठ शीलावर राहतील आणि नेहमीप्रमाणे गृहस्थ जीवनात परत येणार नाहीत; यापुढे ते आता ते भाऊ आणि बहीण म्हणून रहातील.

त्यांच्या पत्नी आणि वहिनीने दररोज सकाळी जेवण घेण्यासाठी त्यांना घरी येण्यास सांगितले आणि त्यांना समर्थन देण्याचे आनंदाने मान्य केले.यू थेट म्हणाले की ते त्यांच्या औदार्यासाठी अत्यंत ऋणी आहेत आणि त्याना सांगितले की त्याना धम्म देणे हाच त्याची परतफेड करण्याचा एकमेव मार्ग आहे.

त्याच्या पत्नीचे चुलत भाऊ, यु बा सोएसहित इतर नातेवाईक, त्यांना पाहण्यास आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी येत असत. सुमारे दोन आठवड्यानंतर, यू थेट यांनी म्हटले कि दुपारच्या जेवणासाठी येणे आणि जाणे यामध्ये पुष्कळच वेळ खर्च होतो म्हणून मग मा ह्म्यिन आणि मा यिन यांनी sala येथे दुपारी जेवण पाठविण्याची तयारी दर्शविली.

यू थेट यांच्या उत्साहाचा चुकीचा अर्थ काढून, गावातील लोक उपदेशासाठी त्यांच्या जवळ येण्यास प्रथम नाखूष होते. त्याना वाटले की ते कदाचित त्यांच्या नुकसानीबद्दल दुःख,आणि खेड्यातील त्याच्या अनुपस्थितीच्या कारणाने त्यांनी आपले भान घालविले आहे.पण हळू-हळू आपल्या भाषणामुळे आणि कृतीमुळे ते एक खरोखरच धम्मनुसार जगणारे एक बदललेले व्यक्तिमत्व आहे असा गावकऱ्यांना अनुभव आला.

लवकरच यु थेट यांच्या काही नातेवाईक आणि मित्रांनी त्यांना विनंती करण्यास सुरुवात केली की त्यांनी त्यांना ध्यान शिकवावे.यु बा सोए यानी त्यांची शेती आणि घरांतील काम याची जबाबदारी स्विकारली आणि यु थेट यांची बहीण व पुतणीने जेवण तयार करण्याची जबाबदारी घेतली. यु थेट जेव्हा 41 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी 1914 मध्ये जवळजवळ 15 लोकांच्या एका समूहाला (Anapana)आनापान शिकविणे चालू केले. (sala)शालामध्ये सर्व विद्यार्थी राहिले होते,परंतू त्यातील काही विद्यार्थी वेळोवेळी घरी जात असत. त्यांनी आपले ध्यान करणारे विद्यार्थी, त्याबरोबरच त्यात स्वारस्य असलेले धम्माचा अभ्यास करीत नसलेल्या लोकांसाठी प्रवचने दिली. त्यांच्या श्रोत्यानी पाहिले की त्यांचे प्रवचन एव्हढे अभ्यासू होते की यु थेट यांना धम्माचे सैध्दांतिक ज्ञान कमी आहे ह्यावर विश्वास  ठेवण्याचे नाकारले.

त्यांची पत्नी आणि भावजय यांच्या उदार आर्थिक मदत आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीमुळे, सर्व लोकाना जेवण आणि इतर आवश्यकता थेट यांच्या धम्म हॉल मध्ये येणाऱ्या साधकांना उपलब्ध करुन दिली होती. इतकी की एकदा तर विपश्यना शिबीर करणाऱ्या मजूरांनी गमावलेल्या वेतनाची भरपाई देखील केली गेली.

साधारणतः 1915 मध्ये एक वर्षाच्या अध्यापनानंतर , त्यांची पत्नी आणि तिची बहीण तसेच कुटुंबातील अन्य सदस्याना घेऊन, जे आता 70 वर्षांचे होते अशा लेडी सयाडॉ यांचा सन्मान करण्यासाठी मोन्य्वा येथे गेले.जेव्हा यू थेट यांनी आपल्या आचार्यांना आपला ध्यानाचा अनुभव आणि ते घेत असलेल्या शिबीराबद्दल सांगितले तेव्हा लेडी सयाडॉ अत्यंत संतुष्ट झाले.

या भेटी दरम्यान लेडी सयाडॉ यांनी आपले काम करणारे कर्मचारी यू थेट यांना असे सांगत दिले :

" हे माझे महान शिष्या,माझे कर्मचारी घे आणि पुढे जात रहा. त्यांना चांगल्या प्रकारे सांभाळून ठेवा. मी आपल्याला दीर्घ काळ राहण्यासाठी तुला देत नाही तर, एका बक्षीसाच्या रुपात देते आहे, जेणेकरुन आपल्या जीवनात कोणतीही दुर्घटना न होवो. आपण यशस्वी झाला आहात. यापुढे आपण 6,000 लोकांना rūpa आणि nama(मन आणि शरीर) चा धम्म शिकविले पाहिजे. आपण शिकलेला धम्म शास्वत आहे. म्हणूनच आपण Sasana (बुध्द शिक्षणाचे युग) चा प्रसार करावा. sasanaला माझ्या ऐवजी वंदन करावे.

दुसऱ्या दिवशी लेडी सयाडॉनी आपल्या विहारातील सर्व भिक्षुना बोलावले. त्यानी यू थेट यांना 10 किंवा 15 दिवस राहण्याची विनंती करुन सर्वाना संबोधित करण्यास सांगितले. यानंतर सयाडॉ यानी सर्व bhikkhus समूहाला सांगितलेः

"लक्षात घ्या, बर्माच्या खालील प्रदेशातील हा एक सामान्य माणूस हा यू पो थेट माझा महान शिष्य आहे. तो माझ्यासारखेच ध्यान शिकविण्यास सक्षम आहे.जे लोक ध्यानाचा सराव करु इच्छितात त्यांनी त्यांचे अनुसरण करावे.त्यांच्यापासून अभ्यासाचे तंत्र जाणून घ्या आणि अभ्यास करा.आपण, दयाका थेट(एक व्यक्ति जो भिक्षूंना ह्या प्रकारचे भोजन,वस्त्र,चिकित्सा, इत्यादिच्या रुपात त्यांची आवश्यकता पूर्ण करण्याचे कार्य उचलतो) धम्माची पताका माझ्या बदली माझ्या विहारात फडकत ठेवील."

यु थेट यांनी धर्म-ग्रंथ शिकलेल्या जवळजवळ 25 भिक्षुना विपश्यना ध्यान शिकविले.ह्या नंतर ते साया थेजी(साया म्हणजे "आचार्य"; ग्यि हे शेवटचे प्रत्यय आदर दर्शविण्यासाठी) नावाने ओळखले जाऊ लागले.

लेडी सयाडॉ यांनी त्यांच्यातर्फे साया थेजी यांना धम्म शिकविण्यासाठी प्रोत्साहित केले. साया थेजी यांना लेडी सयाडॉ यांचे विपुल साहित्य मुखोद्गत होते,आणि ते धर्म-ग्रंथांचे संदर्भ देऊन अशा प्रकारे धम्म समजाऊन सांगण्यात सफल होत की सर्वात अधिक शिकलेल्या Sayadaws (भिक्षु शिक्षक) यांना त्यात एकही चूक सापडत नसे. लेडी सयाडॉ ऐवजी विपश्यना शिकविण्याची ही एक गंभीर जबाबदारी होती, परंतू साया थेजी यांना सैध्दांतिक ज्ञानाच्या कमतरतेमुळे थोडी आशंका होती. आपल्या आचार्यांवरील प्रगाढ आदरामुळे त्यांनी नम्रतेने लीन होत त्यांना सांगितलेः

"आपल्या शिष्यामध्ये, मी सर्वांत कमी धर्म-ग्रंथ शिकलो आहे.विपश्यना शिकविताना sasanaचे आपल्या आज्ञप्तिनुसार वाटणे अत्यंत सूक्ष्म आहे, तरीसुध्दा ते अत्यंत कठिण आहे, सर. याच कारणामुळे मी आपल्याला विनंती करतो की, जर कोणत्याही क्षणी स्पष्टीकरणासाठी आपल्याला विचारावेसे वाटल्यास,आपण मला मदत आणि मार्गदशन करावे. कृपया माझे आधारस्तंभ व्हा,आणि आवश्यकता भासल्यास ताकीद द्या."

लेडी सयाडॉ यांनी उत्तर देतना आश्वस्त केले की," मी आपल्याला सोडून देणार नाही, इतकेच नाही तर मरताक्षणी सुध्दा."

साया थेजी आणि त्यांचे नातेवाइक दक्षिण ब्रह्मदेश मधील आपल्या गांवी परतले आणि लेडी सयाडॉ यांनी सोपविलेल्या कार्याबाबत परिवाराच्या अन्य सदस्यांबरोबर चर्चा केली. साया थेजी यांनी ब्रह्मदेशामध्ये चौफेर प्रवास कण्याचा विचार केला, असा विचार करुन की ह्यामुळे अधिक लोकांबरोबर संपर्क होईल. पण त्यांच्या भावजयीने सांगितले की,"आपल्यासाठी येथे एक धम्म हॉल आहे,अणि आम्ही छात्रांसाठी भोजन तयार करुन आपल्या कार्यामध्ये सहाय्यक होऊ. येथे का नाही राहू शकत आणि शिबीर घेऊ शकत? येथे अनेक लोक विपश्यना शिकण्यासाठी येतील." त्यानी सहमती दर्शविली,आणि प्यव्ब्वेग्यि मधील salai मध्ये नियमितपणे शिबीरांचे आयोजन करणे चालू केले.

त्यांच्या भावजयीने भविष्यवाणी केली होती, त्याप्रमाणे,पुष्कळ लोक येऊ लागले,आणि एक ध्यान शिक्षक(आचार्य) म्हणून साया थेजी यांची ख्याती पसरली. साधे शेतकरी आणि मजूर,याबरोबरच ज्या लोकांना पाली ग्रंथ चांगल्या प्रकारे अवगत आहे अशांना देखील त्यांनी शिकविले.ब्रिटिश शासनाखाली असलेल्या ब्रह्मदेशाची राजधानी रंगून पासून हे गांव दूर नव्हते,त्यामुळे सरकारी कर्मचारी व ऊ बा खिन सारखे शहरातील नागरिक देखील येऊ लागले.

जसजसे अधिक आणि अधिक लोक ध्यान जाणून घेण्यासाठी येऊ लागले, साया यू थेजी यांनी यू न्यो,यू बा सोए आणि यू औन्ग न्युन्ट सारख्या काही जुन्या अनुभवी साधकांना साहाय्यक आचार्य म्हणन नियुक्त केले.

केंद्राची प्रगती वर्षानुवर्ष होत राहिली जो पर्यंत तेथे भिक्षू आणि भिक्षुणीं सहित 200 छात्र शिबीरामध्ये सामिल होऊ लागले. तेथे धम्म-हॉलमध्ये पुरेशी जागा नव्हती, म्हणून काही अनुभवी छात्र त्यांच्या घरी ध्यानाचा अभ्यास करीत आणि sala मध्ये फक्त प्रवचनासाठी येत असत.

वेळो वेळी साया थेजी, लेडी सयाडॉ यांच्या केंद्रावरुन परत येत असत, तेव्हा स्वतः एकांतात आणि मौनामध्ये रहात आणि दिवसातून केवळ एकदाच भोजन घेत असत. इतर bhikkhus भिख्खू सारखे, त्यांनी कधीही त्यांच्या ध्यानाच्या उपलब्धी वर चर्चा केली नाही.जर चौकशी केलीच तर, त्यांनी किंवा त्यांच्या छात्रानी ध्यानाची कोणती अवस्था गाठली होती हे ते सांगत नसत, परंतु व्यापक स्वरुपात सर्व ब्रह्मदेशभर समज होता की ती anagamiअनागामी (अंतिम मुक्ति आधीची शेवटच्या अवस्थेपर्यंत पोहोचलेली व्यक्ती) व्यक्ती होती.

कारण की विपश्यना आचार्यांची उपलब्धता त्या वेळेस दुर्लभ होती, साया थेजी यांना काही अडचणींचा सामना करावा लागला, जो भिक्षु आचार्यांना करावा लागत नसे. उदाहरणार्थ, काही लोकांनी त्यांना अशासाठी विरोध केला की त्यांचा शास्रामध्ये जास्त अभ्यास नव्हता. साया थेजी यांनी ह्या टीकेकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि अभ्यासाचे सुपरिणाम दृग्गोचर होऊ दिले.

जे लोक त्यांच्याकडे येत असत,त्या सर्वांना आपल्या अनुभवाच्या मार्गदर्शनानुसार आणि लेडी सयाडॉ यांच्या मॅन्युअलच्या संदर्भाचा उपयोग करुन 30 वर्षापर्यंत ध्यान शिकविले. 1945 मध्ये,जेव्हा ते 72 वर्षांचे झाले, त्या वेळेपर्यंत त्यांनी हजारो लोकांना ध्यान शिकवून आपले उद्दिष्ट पूर्ण केले. त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता,त्यांची भावजय देखील अर्धांगवायूने पिडीत झाली होती, आणि त्यांचे स्वतःचे स्वास्थ्य देखील खालावत चालले होते.म्हणून त्यांनी आपला पुतणा व पुतण्या यांच्यामध्ये आपली संपत्ती वाटून टाकली, आणि आपल्या धम्म हॉलच्या देखभालीसाठी भाताची 50 एकर शेतजमीन बाजूस ठेवली.

त्यांच्या जवळ 20 म्हैस/रेडे होते ज्यांनी पुष्कळ वर्षे त्यांच्या शेतात नांगरणीचे काम केले. जे लोक करुणतेने त्याना सांभाळतील असे माहीत होते अशांमध्ये त्यांनी त्यांना वाटून टाकले, आणि अशी प्रार्थना करुन पाठवून दिले की, "तुमचे माझ्यावर उपकार आहेत.आपले आभारी आहोत, भाताची वाढ झाली आहे.आता आपण चांगल्या जीवनाच्या अस्तित्वासाठी ह्या प्रकारच्या जीवनापासून कार्यमुक्त आहात,"

साया थेजी वैद्यकीय उपचार आणि त्यांचे विद्यार्थी यांना पहाणे अशा दोन्हीसाठी रंगूनला आले.त्यांनी त्यामधील काही लोकाना सांगितले की त्यांचा मृत्यू रंगून येथे होईल आणि त्यांचा अशा जागी अंतिम संस्कार व्हावा, ज्या जागेवर तेथे पूर्वी कोणाचाही अंतिम संस्कार झालेला नसावा, त्यांनी हेदेखील सागितले की त्यांची राख पवित्र स्थानी ठेऊ नये कारण ते संपूर्णतः विकारमुक्त नाहीत, म्हणजेच ते एक arahant अरिहंत (पूर्णपणे ज्ञानी ) नाहीत.

त्यांच्या शिष्यापैकी एकाने श्वेडागॉन पागोडाच्या उत्तर उतारावरील अर्झानिगॉने येथे एक ध्यान केंद्र स्थापन केले होते. जवळच एक बॉम्ब निवारा होता जो दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी बांधला गेला होता.साया थेजी यांनी ध्यानगुंफाच्या स्वरुपात ह्या निवाऱ्याचा उपयोग केला.रात्री ते त्याच्या साहाय्यक आचार्यांपैकी एकाबरोबर राहू लागले. महालेखापाल ऊ बा खिन,आणि आयकर आयुक्त,यू सान थेइन सहित रंगून मधील त्यांचे शिष्य जेव्हढा वेळ मिळेल तितका वेळ त्यांना भेटण्यासाठी येत असत.

त्यांनी सर्वाना जे कोणी त्यांना भेटण्यास येत, त्यांना ध्यानाच्या अभ्यासात मेहनत घेण्याची,भिक्षु आणि भिक्षुणी जे ध्यानाचा अभ्यास करण्यासाठी येतील त्यांच्याबरोबर चांगली वर्तणूक ठेवण्याचे, शरीर ,वाणी आणि मन यांना चांगल्या प्रकारची शिस्त लावण्याचे, आणि जे काही करत आहात त्यामध्ये बुध्दाला सन्मान देण्याचे निर्देश दिले.

साया थेजी यांनी रोज संध्याकाळी श्वेडागॉन पागोडामध्ये जाण्याची सवय लावून घेतली होती, परंतु एका आठवड्यानंतर त्या खोदलेल्या निवाऱ्यात बसण्यामुळे थंडी आणि ताप येऊ लागला.चिकित्सकांनी उपचार करुनही,त्यांची तब्येत खराब होत गेली. जेव्हा त्यांची तब्येत आणखी खराब झाली तेव्हा त्यांचे पुतणे आणि पुतण्या प्याव्ब्वेग्यि येथून रंगून येथे आले. रोज संध्याकाळी त्यांचे जवळजवळ 50 शिष्य, एक साथ ध्यानासाठी बसत. ह्या सामूहिक ध्यानाच्या वेळी साया थेजी स्वतः काहीच बोलत नसत, परंतु चुपचाप ध्यान साधना करीत राहत.

एका रात्री सुमारे 10:00 वाजता, साया थेजी काही शिष्यांसोबत होते( यु बा खिन उपस्थित रहाण्यास असमर्थ होते).ते आपल्या पाठीवर झोपले होते, आणि त्यांचा श्वास जोराने आणि दीर्घकाळापर्यंत होत होता. शिष्यांपैकी दोन त्यांच्याकडे हेतुपूर्वक पहात होते, बाकीचे चुपचाप ध्यान साधना करीत होते.बरोबर रात्री 11:00 वाजता त्यांचा श्वास खोल गेला. असे वाटत होते की, एक श्वास घेणे आणि सोडण्यासाठी पाच मिनिटे लागत होती. अशा प्रकारे तीन श्वास घेतल्यानंतर श्वास घेणे पूर्णपणे बंद केले आणि साया थेजी यांचे निधन झाले.

त्यांच्या शरीरावर श्वेडागॉन पागोडाच्या उत्तर दिशेस असलेल्या उतारावर अंतिम संस्कार केले गेले आणि यु बा खिन आणि इतर शिष्यानी नंतर त्या जागेवर एक छोटासा पागोडा बांधला. परंतु कदाचित ह्या एकमात्र आचार्यांचे सर्वात योग्य आणि उचित स्मारक हे आहे की लेडी सयाडॉ यांनी समाजातील सर्व वर्गांमध्ये धम्म पसरविण्याचे सोपवलेले कार्य अजूनही चालू आहे.